You Have 1 Item in your Cart. Price is $199
आपल्या भागात काही वर्षापूूर्वी दरवर्षातून सुमारे 90 मे 100 दिवस पाउस पडत असे परंतु गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान तेव्हडेच असते पण पाउस फक्त 40 ते 45 दिवसात पडतो. यामुळे नाल्यातून वाहणारे पाणी वेगाने वाहते व सोबत मोठया प्रमाणवर नाल्याच्या पात्रात गाळ आणते. नाले अतिक्रमणामुळे, गाळ साठल्यामुळे अरुंद व उथळ झाालेले आहेत. कमी वेळात व जास्त प्रमाणात पडलेला पावसाचे पाणी अरुंद व उथळ नाल्यात साठवू शकलो नाही. त्यामूळे हे पाणी एकतर आजूबाजूच्या शेतात शिरते व नुकसान करते व पुढे वाहून जाउन नदीत मिळते ज्याचा उपयोग नाल्याचे परिक्षेत्रातील शेतीला, पशुंना, विहिरींना गावांना होत नाही ते वाया जाते. पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या गावाच्या लगतच्या नाल्याचे जलसंधारण करणे, साठवणुकीसाठी तसेच जलपातळीत वाढ होणे यासाठी नाल्याचे रुदीकरण व खोलीकरण करुन आवश्यक ते बांध तयार करुन जागोजागी जलसाठे निर्माण करणे गरजेचे आहे व जे सहज शक्य आहे यासाटी शेतक-याच्या जतिनीची गरज नाही हे ... पुढे वाचा
आपल्या भागात पूर्वापार गावे ही नदी नाल्यांचे आधाराने काठावर वसलेली आहेत. आज प्रत्येक गावात पाणी प्रश्न पण जवळजवळ प्रत्येक गावाला गाव शिवाराला नाला उपलब्ध आहे. प्रत्येक नाल्याला स्वतंत्र पाणलोट क्षेत्र उपलब्ध आहे. त्याचेवर परिणामकारक कार्य करावे व पाणी प्रश्न आपला आपणच सोडवावा. पाणी अडवा-साठवा-जिरवा व योग्य रितीने वापरा हिच कळकळीची विनंती आहे व हे कार्य आपल्या गावात आजच सुरु करा हे आवाहन आहे.
Copyright © 2016. Water Is Life
Powered by Bharati Web Pvt. Ltd.